'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेमुळे आम्ही बदललो, वेगळीच कलाटणी मिळाली; कलाकारांनी सांगितले रंजक अनुभव
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे 500 भाग पूर्ण झाले आहेत. माऊली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. न'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेतील कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेविषयी रंजक गोष्टी सांगितल्या आहेत