तुकाराम मुंढेंनी गरिबांना लुटणाऱ्यांना सरळ केलं, त्यामुळेच बदली झाली | हेरंब कुलकर्णी
1046 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत चळवळ सुरु केली आहे. "तुकाराम मुंढे नेहमी चांगलं आणि निस्वार्थी काम करतात, आरोग्य खात्यातले सगळे घोटाळे काढतात, तसेच तुकाराम मुंढेंनी करोना काळातील गैरव्यवहाराची माहिती मागवल्याची चर्चा आहे आणि म्हणून त्यांची बदली झाली, तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांची गरज असून त्यांची वारंवार होणारी बदली आपण थांबवायला हवी, त्यासाठी आपण सामान्य जनतेनं ठोस पाऊल उचलण गरजेच आहे" असं आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केलं आहे, त्यांनी याबाबत एक ट्वीट करत ही चळवळ सुरु केली आहे. तसेच ही चळवळ मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली तर यावर कारवाई होऊ शकेल असा विश्वासही हेरंब यांनी व्यक्त केला आहे,