आयटीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली; पांढऱ्या जांभळाची शेती फुलवली, तरुणानं करून दाखवलं
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
आयटी इंजिनिअर त्यांच्या क्षेत्रात काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत असतातच पण तेच डोकं जर शेतात चालू लागलं तर,. कारण अहमदनगरमधल्या एका आयटी इंजिनिअरनं शेती करण्याचा निर्णय घेऊन चांगल्या पगाराची नोकरीच सोडली. आणि पारंपारिक पीक न घेता थेट पांढऱ्या जांभळाची शेती करत नवीन प्रयोग केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. विक्रांत यांनी शेतीसाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करून दाखवला, नोकरीच्या मागे न लागता, शेतीत नवीन प्रयोग करून आर्थिक प्रगती नक्कीच करू शकतो हे विक्रांत यांनी दाखवून दिलं. त्यामुळे तरुणांनी शेतीकडे वळण्यास हरकत नाही याचं बळही विक्रांतच्या प्रयोगानं दाखवून दिलं.