पावसाळ्यात जंगलात येणाऱ्या रानभाजीची शेती, शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न
अकोला चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
जंगलात आपोआप उगवणाऱ्या भाज्या म्हणजेच रानभाज्या... या भाज्यांची स्वतःहून कुणी लागवड करत नाहीये. मात्र अकोल्यातील धानोरा गावातील श्रीकृष्ण पांडुरंग लांडे यांनी धाडसी निर्णय घेतला आणि चक्क करटुल्याची शेती केलीये.अकोला शहरापासून वीस किमी अंतरावर असलेल्या धानोरा गावातील श्रीकृष्ण लांडे यांच्याकडे ५ एकर शेती आहे. लांडे पारंपरिक पिके घेतात, मात्र त्यातून हवा तसे उत्पन्न त्यांना मिळत नव्हतं. म्हणून त्यांनी युट्युबवरून आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शन नुसार त्यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात पाच गुंठ्यात रानातील मेवा म्हणून ओळख जाणारं करटोल्याची भाजी लागवड केली. त्यावेळी त्यांना चांगलं उत्पन्न झालं होतं, म्हणून या वर्षी देखील त्यांनी करटोल्याची लागवड क्षेत्र वाढवल असून ते दहा गुंठयांपर्यंत पोहोचलं.