अडीच वर्ष घरात बसणाऱ्यांना काय कळणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे महत्त्व : एकनाथ शिंदे
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी हा बोगसपणा असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे.सरकारला आता कुणी दारातही उभं करायला तयार नाही, असे म्हणत सरकारवर घणाघात केलाय.त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड येथील शासन आपल्या कार्यक्रमातून प्रत्युत्तर दिलंय.ते म्हणाले, अडीच वर्ष जे घरी बसले त्यांना काय कळणार शासन आपल्या दारीचं महत्त्व.काय त्यांना कळणार शेतकरी, कष्टकरी आणि माता बगिणींच्या वेदना.त्यांनी या कार्यक्रमाला बोगसगिरी म्हणणं हा या कार्यक्रमाला आलेल्या लोकांचा अपमान आहे.