लाखोंचा खर्च करून कांद्याला कवडीमोल दर; शेतकऱ्यांनी फिरवला कांद्यावर नांगर
1072 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजगावं की मरावं असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झालंय. बीड तालुक्यातील चाकरवाडी शिवारात युवा शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पिकवलेला कांदा अक्षरशः मातीमोल झालाय. त्यामुळे यावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.चाकरवाडी येथे तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेती करण्याचा निर्णय घेतला. यातून काही लखन वरपे आणि अशोक अनवणे यांनी तशी तयारी केली. यातून सहा एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली. मात्र मागील पंधरा दिवसांमध्ये झालेल्या पावसानं हा कांदा संपूर्ण सडून मातीमोल झाला आहे.