मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, सरसकट प्रमाणपत्र देण्याच निर्णय घेतला नाही ; ॲडव्होकेट विशाल कदम यांची टीका
1087 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आंदोलक मराठा मनोज जरांगेंच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.कुणबी नोंद आढळलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना कुणबी दाखला देण्याची मागणी सरकारने मान्य केली.मात्र, या निर्णयावर मराठा समाजातून आक्षेप घेण्यात येत आहेत.सगेसोयरे संदर्भातला निर्णय कायद्याला धरून नसल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.याबाबत वकील विशाल कदम यांनी भूमिका मांडली.नियमांचा मसुदा दाखवून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप विशाल कदम यांनी केला.मनोज जरांगेसह मराठा समाजाला सरकारने फसवलं, असं विशाल कदम म्हणाले.हा गंडवण्याचा प्रकार असल्याचं सांगत विशाल कदम यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला.सरसकट प्रमाणपत्र देण्याच निर्णय घेतला नसल्याची खंत विशाल कदम यांनी व्यक्त केली.