समृद्धी महामार्गावर ट्रक मध्येच थांबवल्याने अपघात, RTO अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा;
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर आज (१५ ऑक्टोबर) विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी RTO अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अंबादास दानवेंनी घटनास्थळाची पाहणी करत स्थानिकांशी बातचीत केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आरटीओने ट्रक मध्येच थांबवल्याने अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी अंबादास दानवेंना दिली. समृद्धी महामार्गावर हप्तेाखोरीसाठी वाहन थांबत असल्याबाबत सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे. तसेच, रात्री आरटीओ विभागाचे जे अधिकारी, कर्मचारी ड्युटीवर असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.