माझं सारं पीक झोपलं, काहीच उरलं नाही; अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, उभं शेत आडवं
1068 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठवाड्यावर दुष्काळाचं सावट असल्याने शेतकरी चिंतेत असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं.अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गंगापूर तालुक्यातील मका-ज्वारीचं पीक शेतात अडव पडलं, त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी मराठवाड्यातील शेतकरी सरकारकडे करत आहेत. गंगापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हुरड्याचं पीक घेतलं जातं या तालुक्यातून जिल्ह्यासह राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हुरडा पुरवला जातो. यामुळे तात्काळ पैसा मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी देखील होण्याचे पीक घेतलं. मात्र, दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या या अपेक्षांवर पाणी फिरलं आहे. आधीच मराठवाडा दुष्काळाच्या सावटा खाली असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर केली जात आहे.