प्रतिकिलो तीन रुपयांचा दर, संतापलेल्या शेतकऱ्यांनी ३०० क्विंटल कांद्यावर फिरवला जेसीबी!
1046 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराछ. संभाजीनगरमधील सुलतानपूर तालुक्यातील शिवारात ही घटना घडली आहे.शेतकरी किशोर वेताळ यांनी एक लाख रुपये खर्च करून दोन एकर शेतामध्ये कांद्याचं पीक घेतलं. कांद्याची लागवड केल्यानंतर अवकाळी पावसाने कांद्याचं मोठं नुकसान झालं.तेच पीक काढण्यासाठी मजुरांसाठी २० हजार रुपये खर्च केले.पण कांद्याला प्रतिकिलो तीन रुपयांचा दर मिळाल्याने ३०० क्विंटल कांद्यावर जेसीबी फिरवला.दरम्यान राज्य सरकारकडून अवकाळी नुकसान भरपाईचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही.