तुळजाभवानीचे दागिने वितळविण्यास राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून मान्यता; २०४ किलो सोने वितळवणार!
1118 views
धाराशिव चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी असंख्य लोक येतात. यावेळी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करण्यात आलेले सोन्या-चांदीचे दागिने आता वितळवण्यात येणार आहे. सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू वितळवून त्या बँकेत ठेवण्याचा ठराव तुळजाभवानी मंदिर समितीने घेतला होता. त्यानंतर समितीने हे दागिने वितळवता यावेत याची रीतसर परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने ती परवानगी आता मंदिर संस्थानाला दिली. त्यामुळे आता या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. जानेवारी २००९ ते जून २०२३ या कालावधीमध्ये देवीच्या चरणी अर्पण केलेले दागिने वितळे जाणार आहेत. २०७ सोने वितळवल्यास ५५ ते ६० टक्के शुध्द सोने मिळणार असल्याची माहिती.... संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दिली आहे.