कितीही कपट-कारस्थान केलं तरी जनतेच्या न्यायालयात खरा न्याय होईल; ओमराजे निंबाळकरांचा शिंदे-फडणवीसांना इशारा
1125 views
धाराशिव चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शिंदे - फडणवीस सरकार सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार ओमराजे निंबाळकरांनी शिंदे-फडणवीसांना मोठं आव्हान दिलं आहे. कितीही कपट-कारस्थान केलं तरी जनतेच्या न्यायालयात खरा न्याय होईल, अशी प्रतिक्रिया ओमराजेंनी दिली आहे. तसेच, सत्तेत येण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाला हे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचंही ओमराजे म्हणाले.