शासनाचं पथक पाहणीसाठी शेताच्या बांधावर पोहोचलंच नाही, धुळ्यातील शेतकऱ्यांचा संताप
1090 views
धुळे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान याचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या पथकाने जाऊन पाहणी करत या नुकसानीचा अहवाल केंद्र शासनाला पाठवला जाणार आहे.उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात केंद्रीय पथकाने जाऊन पाहणी केली.मात्र धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन देखील केंद्राचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाही असं शेतकरी म्हणाले.केंद्रीय पथक परस्पर जळगावच्या दिशेने रवाना झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहेकेंद्रीय पथकाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी न करताच धुळे जिल्ह्यातून पळ काढल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.