माझ्या बापाला १०० क्विंटल कांद्याचे २७५ रुपये मिळाले, आमची किंमत रद्दीपेक्षाही कमी लावली?; कृषीकन्येची हळहळ
धुळे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
धुळ्यातील साक्री येथील कृषी कन्या प्रियंका जोशींनी कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी.. .केलेली एक कविता सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही कविता करणाऱ्या प्रियंका जोशींनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी संवाद साधला आहे. आपल्या राज्य सरकारला आणि केंद्रातील मोदी सरकारलाही शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत, कांद्याच्या प्रश्नावरून आक्रमक होणारा आमचा शेतकरी वर्षानुवर्षे फक्त स्वतःचेच प्रश्न मांडत आहे. मात्र गेल्या ९ वर्षांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, असं ही कृषीकन्या म्हणते. चंद्रावर आम्ही आज जाऊन पोहोचलो मात्र जगाचा पोशिंदा असणारा आमचा शेतकरी आजही सुखी नाही.. अशी व्यथा प्रियंका जोशींनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना मांडली.