तोंडाशी आलेला घास हिरावला, पीक जळलेलं पाहून शेतकरी शेतात बसल्या जागी ढसाढसा रडला
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या वर्षी दभाषी गावातील हे चित्र आहे.... भरत बडगुजर या शेतकऱ्याच्या शेतातील हरभरा पिक जळून खाक झाल्याने या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.... हाताशी आलेल्या अचानक आग लागली की कुणी किरकोळ वादातून जाळू टाकलं हे माहिती नाही... पण पीक पाहून शेतकरी बडगुजर यांनी एकच हंबरडा फोडत रडायला सुरुवात केली... यात सुमारे त्यांचं दोन लाखांचं नुकसान झालंय.... या शेतात यावर्षी त्यांनी हरभऱ्याचे पीकेव्ही २ हे वाण लावलेले होते. कुटुंबासह मजूर लावून हरभरा पिक काढून घेऊन शेतात एकाच ठिकाणी जमा करून ठेवले होते... नेहमीप्रमाणे रात्री ते घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी बाजूलाच शेत असलेल्या शेतकरी मित्राने बडगुजर यांना फोन लावून सगळी माहिती दिली. शेतकरी बडगुजर तात्काळ सकाळीच शेतात येऊन पोहोचले. पण हे भयानक दृष्य पाहताच ते हतबल झाले... आता हरभरा पीक लागवडीसाठी घेतलेले कर्जाचे ओझे कसे फेडावे या विवंचनेत आहेत... शेतकरी बडगुजर यांचा हरभरा कसा जळाला की जाळला याचा शोध घ्यावा, अशी आशा शेतकरी करीत असून त्यांनी या संदर्भात पोलीस स्टेशन नरडाणा येथे फिर्याद दिलीये... आता तपासात काय समोर येतं हे पाहावं लागेल.....dhuleTimesXP MarathiUpdated: 13 Feb 2024, 12:40 pm