तुम्ही आमच्या आंदोलनाविरुद्ध एसआयटी लावली, आयुष्यात केलेली चूक महागात पडेल : जरांगे
1576 views
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब करादेवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याला मराठे आयुष्यभर गुलाल लागू देणार नाहीत असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली मध्ये केले आहे. तुम्ही एसआयटी नेमली ना, बघा राज्यातलं वातावरण दूषित झालेय. मराठ्यांमध्ये प्रचंड नाराजीची लाट निर्माण झालीये, असेही ते म्हणाले. आता तुम्हाला भावनिक लाट काय असते आणि आयुष्यात केलेली चूक किती महागात पडते हे फडणवीस यांच्या लक्षात येईल, असे आव्हानच त्यांनी दिले. तुमचे राजकीय करियर कायमचे बरबाद होणार. तुम्ही किती खुनशी आहेत हे आम्हाला माहिती आहे, असेही ते म्हणाले.