तुम्ही काय शेतकऱ्यांचं वाटोळे करायला बसले आहात काय? आमदार संतोष बांगर यांनी महाबीज कर्मचाऱ्याला सुनावलं
1066 views
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाबीज कर्मचाऱ्यांनी सात महिन्यापूर्वी शेतकऱ्यांची घेतलेली करडई आता गुणवत्तापूर्ण नाही असं म्हणत नापास केली. या पीडित शेतकऱ्यांनी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना भेटून संपूर्ण प्रकार सांगितला. आमदार बांगर यांनी लागलीच महाबीज कर्मचाऱ्यांना फोन केला. तुम्ही काय शेतकऱ्यांचं वाटोळं करायला बसले आहात की काय? अशा शब्दात जाब विचारला. सात महिन्यापूर्वी घेतलेल्या करडई तुम्ही आता गुणवत्तापूर्ण नाहीत म्हणून नापास करता हे चुकीचे आहे. तुम्ही त्यांना करडई घेतल्यानंतर तातडीने तसे कळवायला हवे होते. परंतु तुम्ही सात महिन्यानंतर करडईची गुणवत्ता ठरवून नापास करता हे अन्यायकारक आहे. तुम्ही शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला तातडीने द्या अन्यथा मी स्वतः तिथे येऊन तुमच्या कार्यालयाला टाळे ठोकेन असा इशाराच आमदार बांगर यांनी दिला आहे.