महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव, तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत समन्वय समिती गठित केली पाहिजे : अनिल पाटील
1075 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल.महायुतीचा उमेदवार प्रत्येक मतदारसंघांमध्ये निवडून आला पाहिजे त्यासाठी आमचा सिंहाचा वाटा असेल. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे, त्यामुळे तालुका पासून ते जिल्हा पर्यंत समन्वय समिती गठित केली पाहिजे.नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये तीन भाजपचे तर तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत. नाशिकमध्ये तुल्यबळ ताकद असूनही जागा मिळाली नाही, आता उत्तम महाराष्ट्रात तरी एक जागा मिळावी.यासाठी आग्रही आहोत, उमेदवार कोण असेल हे तिन्ही पक्ष ठरवतील, असंही ते म्हणाले.