बड्या कंपनीतलं ५० लाखांचं पॅकेज डावललं; इंजिनिअर तरूणाचं UPSC मध्ये ८४४ वी रॅंक मिळवून घवघवीत यश
1339 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराया आई-बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आनंदाश्रू त्यांच्या मुलाच्या यशाची पावती. ज्यानं UPSC मध्ये घवघवीत यश मिळवलंय. लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती म्हणून जालन्यातल्या एक तरुणानं ५० लाखांचं पॅकेज डावललं आणि थेट UPSC केली क्रॅक केली. जालन्यातील अग्रसेननगर भागात राहणारा रहिवासी अभिजय विजय पगारे हा बंगळूरू येथे एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतोय. त्याला ५० लाखांचं पॅकेज आहे. पण अभिजयला लहानपणासून समाजासाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती म्हणून त्यानं UPSC निवडली. पहिल्या प्रयत्नात यश आलं नाही म्हणून न खचता त्यानं अजून प्रयत्न केले आणि अखेर बाजी मारली. त्याचं हे यश पाहून आई-वडिल आणि त्याच्या कुटुंबियांनी कमालीचा आनंद झाला. सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू होते.