सरकारने आरक्षणासोबत सगेसोयरेची अंमलबजावणी केली असती तर अंगावरील गुलाल १५ दिवस निघाला नसता : जरांगे
1086 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे शांततेत आंदोलन करुन देखील दाखल झालेले गुन्हे मागं घेण्याची मागणी केली. अंतरवाली सराटीमधील महिलांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती. त्या केसेस मागं घेता येतात का सरकारनं पाहावं, असं मनोज जरांगे म्हणाले. हैदराबादचं गॅझेट शिंदे समिती स्वीकारु शकतं, मुंबई सरकारचं गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट स्वीकारायला हवं होतं, असंही म्हणाले. लोकांना सांगण्यासारखं तुम्ही काय केलं, अधिसूचना काढून अंमलबजावणी केली नाही. तुम्हाला तुम्ही मोठे समजत असाल तर जनता नाही ना मानत, असं जरांगे म्हणाले. एकमेकाला दिलं तर माणूस खूश होतो. सरकारनं आरक्षण दिलं पण अंमलबजावणी केली नाही. अधिसूचना काढली पण सगेसोयरेची अंमलबजावणी केली नाही. हे देऊन ते देखील दिलं असतं तर तुमच्या अंगावरील गुलाल १५ दिवस निघाला नसता, असं मनोज जरांगे म्हणाले. येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.