कुणाचंच न ऐकणारे Manoj Jarange अखेर पत्रकारांच्या हातून पाणी प्यायले, विनंतीला मान दिला
1153 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा गेल्या ५ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. गेल्या ५ दिवसांपासून अन्न व औषध, उपचार काहीही घेण्यास मनोज जरांगे वारंवार नकार देत होते. मात्र, आज (१४ फेब्रुवारी) रात्री अखेर खाजगी डाॅक्टर आणि पत्रकारांच्या आग्रहास्तव जरांगेंनी पाणी पिण्यास होकार दिला अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला. अनेक दिवस अन्नाचा एकही कण न खाल्ल्याने पाणी पित असताना जरांगेंना त्रास होत होता. मात्र डॉक्टरांनी सल्ला दिल्याने आणि पत्रकारांच्या आग्रहास्तव अखेर जरांगे पाणी प्यायले. यावेळी जमलेल्या मराठा बांधवांनीही जरांगेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.