सरकारची सुपारी घेऊन बोलणं तुमच्यासारख्यांना शोभत नाही, मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंवर पलटवार
1204 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा नेते मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, मराठा समाजाला मुंबई जाऊन काय मिळालं आणि काय नाही मिळालं.हे एखाद्या घटना तज्ञाला विचारून घ्या. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंना विनंती केली आहे. मी गोरगरीब मराठ्यांचे काम करतो ही त्यांच्या एकट्याची नाही बऱ्याच जणांची पोटदुखी आहे.राज ठाकरेंना माझी विनंती आहे की, तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे, गैरसमज पसरवू नका.सरकारची सुपारी घेऊन बोलणं तुमच्यासारख्यांना शोभत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.आमच्या पोरांना सगळं कळतं आरक्षण म्हणजे काय आहे आणि काय नाही.आमच्यात फूट पाडण्याचं तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.