सरकारनं धोका दिला, नाहीतर जरांगेंवर उपोषणाची वेळ आली नसती; मराठा बांधवांचा संताप
1030 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरु केलंय.उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे.सरकारनं धोका दिला अशी भावना मराठा बांधवांनी बोलून दाखवली आहे.वेगळ आरक्षण टिकत नाही, मुख्यमंत्री टिकणार आरक्षण कसं देणार हे त्यांनी सांगावं असा सवाल मराठा बांधवांनी केला.सरकारने जर अंमलबजावणी केली असती तर उपोषणाला बसायची वेळ आली नसती असं मराठा बांधव म्हणाले.जरांगे यांनी किमान पाणी घ्यायला पाहिजे असंही मराठा बांधव म्हणाले.जर जरांगे पाटलांची तब्येत खराब झाली, त्यांच्या जीवाला काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला.