कायदा बनलाय, जवळपास आरक्षण मिळालंय, मराठे जिंकून आलेत : मनोज जरांगे पाटील
1801 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआरक्षण घेऊनच मराठे मुंबईतून परतले आहेत. सग्यासोयऱ्या बाबत जो आदेश काढला त्या कायद्याअंतर्गत किमान एक प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. त्यादिवशी आमच्या विजयाचा कार्यक्रम असेल. काल कायदा बनलाय, अंमलबजावणी झाली पाहिजे. आरक्षण मिळालंय, कायदा पारित झालाय, १०० टक्के मराठे जिंकलेत, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले. फसवलंय का? आरक्षण टिकणार नाही, काही तरी एक म्हणा असंही ते टीका करणाऱ्यांना म्हणालेत. ३१ जानेवारीला मनोज जरांगे पाच महिने २ दिवसानंतर आपल्या घरी जाणार आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उत्तर दिलं आहे.