तीन दिवसांच्या तणावानंतर कोल्हापूर पूर्वपदावर; नागरिकांप्रमाणे व्यावसायिकांनाही दिलासा
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
तीन दिवसाच्या तणावपूर्ण वातावरणानंतर कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व बाजारपेठ पुन्हा सुरु झाल्या आहेत. तणावाची परिस्थिती निवळल्याचं दिसून येत आहे. इंटरनेट सेवा सुरु झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आल्यामुळे नागरिकांप्रमाणे व्यावसायिकांनाही दिलासा मिळालाय.