२२ वी ऊस परिषद; राजू शेट्टींचं २२ दिवस आत्मक्लेष आंदोलन, ५२२ किमीची पदयात्रा, स्वाभिमानी आक्रमक
1241 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासाखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये द्यावेत यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. २२ व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर आजपासून (१७ ऑक्टोबर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ दिवसांच्या आक्रोश पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिरोळमधील दत्त कारखाना येथून ही पदयात्रा सुरु झाली असून राजू शेट्टी शहरातील ३७ कारखान्यांवर जाणार असून २२ दिवस तब्बल ५२२ किमीचा प्रवास करणार आहेत. तसेच गेल्या वर्षीचे ४०० रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही,असा इशाराही राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिला आहे.