चलो रत्नागिरी; बारसू आंदोलकांच्या समर्थनार्थ राजू शेट्टींचं राज्यभरातील शेतकऱ्यांना आवाहन
1043 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारसू रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टींनी आता तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. बारसू रिफायनरी ही रत्नागिरी महाराष्ट्रात आहे की आणखी कुठे असा संतप्त सवाल राजू शेट्टींनी केला. जर तुम्ही ते काहीच शेतकरी आहेत असं समजत असाल तर आम्ही राज्यातील सर्व शेतकरी एकत्र आणू, असा इशारा शेट्टींनी दिला. यावेळी, राजू शेट्टींनी 'चलो रत्नागिरी'चा नारा दिला असून स्वाभिमानीचे काही कार्यकर्तेही बारसूला निघाले. परंतु, शेतकरी संघटनेचे नेते प्राचार्य जालिंदर पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.