जे अजितदादा अन् साखर कारखानदारांच्या मनात, तेच राज्याचं धोरण; राजू शेट्टींची शिंदे-फडणवीसांवर टीका
1335 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे-फडणवीस सरकारच्या. साखर उत्पादकांविषयीच्या धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आम्ही कर्तृत्ववान समजत होतो, परंतु ते साखर कारखानदारांच्या. ताटाखालचं मांजर निघाले, अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. एक रकमी एफ आर पी देण्यासंदर्भात शासन निर्णय व्हावा यासाठी आम्ही अनेकदा सरकारचे उंबरठे.झिजवले मात्र अद्याप याबाबत शासन निर्णय नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले. जे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कारखानदारांच्या मनात असेल तेच राज्याचे धोरण असणार. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त म म म्हणणार अशीही नाराजी शेट्टींनी व्यक्त केली. आम्हाला प्रतिटन दुसरा हप्ता ४०० रुपये हवा आहे आणि तो मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही.असा इशाराही राजू शेट्टींनी यावेळी दिला आहे.