९ तासांच्या आंदोलनाला यश, शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना खांद्यावर घेतलंगेल्या आठ तासापासून सुरू असलेलं राजू शेट्टींचं राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन अखेर थांबलं आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी मागण्या मान्य केल्याने....स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाला आहे.मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे त्यांनी १०० रुपये...तर ३ हजार पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव...एकमताने मान्य करण्यात आला असून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.