संकल्प यात्रेच्या समन्वयकांनी पळ काढला; व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य तरुणानं सांगितलं
1225 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली या गावात केंद्र सरकारचा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवण्यात आला.या रथावर भारत सरकार हे नाव अगदी छोट्या अक्षरात आणि मोदी सरकारहे नाव अगदी ठळक अक्षरात लिहिलेलं होतं.यालाच आक्षेप घेत संविधान संवाद समितीचे राज्यसचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी प्रश्नांचा भडीमार केला.राजवैभव यांच्या प्रश्नांनी निरुत्तर झालेल्या या रथाच्या समन्वयकांनी आपला गाशा गुंडाळला.या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओचं सत्य आता स्वतः राजवैभव यांनी महाराष्ट्र टाईम ऑनलाईनला सांगितलं आहे.