धरणात पाणी कमी म्हणून ७० हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना सोबत घेतलं, माजी आमदाराचा टोला
1217 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका सुरू झाल्या आहेत.शिवसेना उबाठा गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.यामध्ये दिनकर माने यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे.भाजपकडून पैसे कोणी दिले तरी घ्या पण काँग्रेसलाच मतदान करा असं विधान दिनकर माने यांनी केलं.तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही दिनकर मानेंनी टीका केली.७० हजार कोटी रुपये घोटाळा करणाऱ्या अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतलं त्याला का घेतलं असा प्रश्न उपस्थित केला.धरणात पाणी कमी आहे म्हणून घेतलं का असा टोला ही दिनकर माने यांनी लगावला.त्यासोबतच अशोक चव्हाण यांच्यावरही दिनकर माने यांनी टीका केली.