एकमेकांशिवाय राहूच शकले नाहीत, पत्नीच्या निधनानंतर अवघ्या अडीच तासात पतीचे निधन
1112 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१०५ वर्षीय सदाशिव शामराव जाधव यांना पत्नी सरस्वती यांच्या निधनाची बातमी कळली आणि ही बातमी कळताच डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या 'त्या' थांबल्या ते सदाशिव यांचे डोळे मिटल्यावरच. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या अडीच तासात सदाशिवरावांनी जगाचा निरोप घेतला. पती पत्नी एकमेकांवर असणारं जीवापाड प्रेम अन् परस्परांच्या शेजारीच झालेल्या चीतेवरील अंत्यसंस्कार पाहून होळी ग्रामस्थच नाही तर पंचक्रोशीतील ग्रामस्थ हळहळले.लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असणारे होळी छोटेसे खेडेगाव. या गावातील सदाशिव शामराव जाधव यांनी आयुष्यभरच नाही तर सात जन्म साथ देण्याचे वचन देऊन आपल्या पत्नीला दीले अन् ते आयुष्याच्या शेवटापर्यंत निभावले.साधारण ७५ वर्षापूर्वी सदाशिव यांचा विवाह सरस्वती यांच्याशी झाला. आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका दोघांनी घेतल्या. आजही त्यांच्या कुटुंबात 32 जण सुखाने नांदत आहेत.