वादळी वारा, अवकाळीने फळबागांचे नुकसान; लातूरमधील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, ९ गुरांचा मृत्यू
1163 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करालातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर चौथ्या दिवशी कायम आहे... उदगीर शहर आणि ग्रामीण, औसा लातूर भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. औसा तालुक्यातील किल्लारी भागातील नांदुर्गा शिवारातील बाबूराव बिराजदार यांची एक एकर द्राक्षाची बाग सोसाट्याच्या वादळी वाऱ्यात आडवी झाली आहे.