राजकारण्यांनो, बारसुबद्दल निर्णय घ्या अन्यथा निवडणुकीत चारी मुंड्या चीत करू; रिफायनरीविरोधात आंदोलन
1172 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारसु रिफायनरी विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून कोकणवासियांचा तीव्र लढा सुरु आहे. मात्र, सरकारकडून याची दखल घेतली जात नसल्याने कोकणवासिय आक्रमक झाले आहेत. आज (१८ जुलै) मुंबईच्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन करत आपली भूमिका मांडली आहे. राजकारण्यांनो, बारसुबद्दल निर्णय घ्या अन्यथा निवडणुकीत चारी मुंड्या चीत करू, इशाराही देण्यात आला. तसेच, कोकणात प्रकल्प हवा पण विनाशकारी नको अशी भूमिका मांडण्यात आली आहे.