टिकणारं आरक्षण दिलंय, सरकारची भूमिका स्पष्ट; आता कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही : मुख्यमंत्री
1222 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला.अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.दरम्यान, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केलं आहे.ते म्हणाले, मराठा समजाला ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या त्या आम्ही दिल्या आहेत.आम्ही स्वतंत्र आरक्षण दिलं, जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आरक्षण दिलं.हे आरक्षण टिकणारं आहे, टिकणारं नाही असं विरोधक कोणत्या आधारावर बोलतात?का टिकणार नाहीत याची कारणं तरी द्या, का टिकेल यांची कारणं आम्ही तुम्हाला देतो.