अशोक चव्हाण हे सोनिया गांधींशी बोलताना रडले, ते घाबरूनच भाजपमध्ये गेले; राहुल गांधींचा मोठा दावा
1102 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबईत शिवतीर्थावर आज (१७ मार्च) इंडिया आघाडीची अत्यंत महत्वपूर्ण अशी सभा पार पडत असून राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह इंडिया आघाडीचे देशभरातील महत्वाचे नेते शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. यावेळी, भाजपवर घणाघात करताना राहुल गांधींनी अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा काढला. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाताना सोनिया गांधींशी बोलले अन् रडले, या शक्तिशी लढण्याची ताकद आपल्यात नसल्याचं हतबलतेने अशोक चव्हाणांनी सांगितलं, ते घाबरूनच भाजपमध्ये गेले असे मोठे दावे राहुल गांधींनी केले आहेत.