ठाकरेंच्या भेटीसाठी हिंगोलीतील शेतकरी मातोश्रीवर, व्यथा ऐकून घेत सरकारकडे केली मोठी मागणी
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पीक कर्ज परतफेड करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अवयव विक्री करण्याचे ठरवलं होतं.अवयव विक्रीचं रेटकार्ड त्यांनी जाहीर केलं आणि हे शेतकरी मुंबईला दाखल झाले होते.मातोश्रीवरून या शेतकऱ्यांना काल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.त्यांना आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पोलिसांना भेटून चौकशी केली.त्यानंतर या शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात आली. मग त्यांना उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर बोलावलं.यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत.यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.ठाकरे म्हणाले, संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो.हे कुठे गेले याचा शोध घेत होतो. तर अटक केली गेली. यांचा काय गुन्हा होता? का अटक केली?