लोकांना पाणी मिळत नव्हतं अन् तुम्ही शामियानात शाही मेजवान्या झोडल्या?; संजय राऊतांचा सवाल
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने १३ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. विरोधकांकडून सरकारला घेरलं जात असून हा आकडा अधिक असल्याचा आरोप होत आहे. अशातच, आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एक सदस्यीय समिती नेमली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अधिकारी प्रामाणिक मी शंका उपस्थित करणार नाही. परंतु, लोकांना पाणी मिळत नव्हतं अन् सत्ताधाऱ्यांनी शामियानात शाही मेजवान्या झोडल्या?, ही एक सदस्यीय समिती याची सुद्धा चौकशी करणार का? असा सवाल संजय राऊतांनी केला.