तुमच्या सारख्या लढवय्यांची महाराष्ट्राला गरज, जरांगे पाटलांना विनंती करत ठाकरेंनी राज्य सरकारला घेरलं!
1014 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्यात अनेक ठिकाणी या आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आहेत.पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राज्य जळत असताना एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाला आहे.तर दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या निवडणूक प्रचारात आहेत.असं म्हणत ठाकरेंनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टीका केली आहे.यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांना विनंती देखील केली आहे.ते म्हणाले, तुमच्या सारख्या लढवय्यांची महाराष्ट्राला गरज आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.