आंदोलनाची धग संपल्यानंतर अधिकारी काय करतील हा प्रश्न आहे | योगेश केदार
1185 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे.मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या.मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यात आल्यानंतर मराठा बांधवांनी जल्लोष केला.मुंबईतील आझाद मैदानातील मराठा बांधवांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.शासनाचे जीआर हे सगळ्याच मराठ्यांचं कल्याण करतील असं नाही असं केदार म्हणाले.गरजवंत मराठ्याला ओबीसी दाखला मिळणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले.सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी ओबीसी आरक्षणात मराठा शब्द येणं गरजेचं असल्याचं मत केदार यांनी मांडलं.सर्वसामान्य मराठा क्रांतीसाठी बाहेर निघाला आहे हे मोठं यश आहे याचा आनंद केदार यांनी व्यक्त केलाय.