वंदेभारत एक्सप्रेस ट्रेनची संपूर्ण स्वच्छता १४ मिनिटांत होणार, स्वच्छतेसंदर्भात रेल्वेचा मोठा निर्णय
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबरपासून स्वच्छ पंधरवड्याला सुरुवात केली आहे. हे पाहता भारतीय रेल्वेने १४ मिनिटांत चमत्कारिक मोहीम सुरू केली. ज्याअंतर्गत 14 मिनिटांत देशभरातील सर्व वंदे भारत रेल्वे गाड्या स्वच्छ करण्यात आल्या. नागपूर स्थानकावरही बिलासपूर-नागपूर-बिलासपूर ही गाडी १४ मिनिटांत स्वच्छ करुन मोकळी झाली. जपानी तंत्रज्ञान वापरून ही मोहीम पूर्ण करण्यात आली. जपानच्या बुलेट ट्रेनच्या ७ मिनिटांचा चमत्कार या संकल्पनेवर आधारीत ही योजना आहे. अवघ्या १४ मिनिटांत ट्रेन स्वच्छ करण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. रेल्वेने साफसफाई करणार्यांची तीन गटात A, B आणि C अशी विभागणी केली होती. यात २४ सफाई कामगार होते. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचे मॉक ड्रील देखील करण्यात आले आहे.