छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंच्या नुरा कुस्तीमुळे ओबीसी आणि मराठा समाजाचं नुकसान : सुषमा अंधारे
1250 views
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणाबाबत जे वातावरण निर्माण झाले त्यामुळे ओबीसी समाजात भीती निर्माण झाली. यावरची प्रतिक्रिया म्हणून ओबीसी मेळावा झाला. मात्र, त्यानंतर ओबीस-मराठा समाज तसेच भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये पेटलेल्या वादावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. टीका करण्यापेक्षा समन्वयाने मार्ग काढावा असा सल्ला सुषमा अंधारेंनी यावेळी दिला. जरांगे म्हणतात, मराठ्यांना निवडून देऊ नका, परंतु ह्यात भाजपचाच फायदा असल्याचं अंधारे म्हणाल्या. तसेच, मराठा आरक्षण राज्याच्या नसून केंद्राच्या हातात आहे, भाजपने लावलेल्या या नुरा कुस्तीमुळे जरांगे आणि भुजबळ आपल्या बांधवांचं नुकसान करत असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.