पाण्याचं नियोजन अन् कमी खर्चात शेतकरी मालामाल; वांग्याच्या पिकानं कमालच केली
1071 views
नंदुरबार चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएकीकडे वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे नुकसान केलं आहे तर दुसरीकडे नंदुरबारमधील एका शेतकऱ्यानं वांग पिकातून बक्कळ पैसी कमावला आहे.नंदुरबार शहरातील माळीवाडा येथे राहणाऱ्या विजय माळी या शेतकऱ्यानं आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर वांग्याच्या मेघना वाणाची लागवड केली. या शेतकऱ्यानं वांग्याची लागवड केली होती, यासाठी त्यांनी एक लाख तीस हजार रुपये खर्च करून आतापर्यंत अडीच लाखांपर्यंचे उत्पन्न घेतलं आहे एवढच नाही तर पुढेही अजून एका लाखाचं उत्पन्न होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यांनी नेमकी काय शकल्ल लढवलीये हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात.