जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच तीन वर्षांपासून गैरहजर, संतप्त पालकांनी शाळेला टाळं लावलं
1121 views
नंदुरबार चे व्हिडिओ सबस्क्राईब करासातपुड्याच्या आदिवासी भागात शाळांवर शिक्षक येत नसल्याने शाळेला पालकांनी कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तळोदा तालुक्यातील वरपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक ते चार वर्गांसाठी जिल्हा परिषदेकडून दोन शिक्षक दिले.दोनपैकी एक शिक्षक तीन वर्षांपासून गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शाळेवर शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला.मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज संतप्त पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकले आहे .जोपर्यंत प्रशासनाच्या वतीने शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडले जाणार नसल्याची माहिती पालकांनी दिली आहे.