झाडं कोलमडली, विजेचे खांब पडले, घरांची पडझड; मनमाड परिसरात तुफान वादळ
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
वादळी वाऱ्याने मनमाड,मालेगाव,चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घातला.वादळामुळे अनेक झाडे कोलमडली, विजेचे खांब पडले, अनेक घरांची पत्रे आणि छत उडून गेली.अचानक आलेल्या वादळामुळे भीतीपोटी नागरिकांची पळपळ झाली.वादळ इतकं भयंकर होतं कि समोरचं काही दिसत नव्हतंत्यामुळे पुणे-इंदौर महामार्गवरून जाणारी वाहने जागच्या जागीच थांबली होती.वादळामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुदैवाने या वादळी वाऱ्यानं कुठेही जीवितहानी झाली नाही.