पाण्याअभावी पिके जळाली, जनावरांना चारा नसल्यानं दुग्ध व्यवसाय ठप्प; निसर्गा पुढे शेतकरी हतबल
1177 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करापाण्याअभावी पिके जळाली, जनावरांना चारा नसल्यानं दुग्ध व्यवसाय ठप्प; निसर्गा पुढे शेतकरी हतबल पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.पाण्याअभावी खरीपाची पिके करपू लागली आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून लोणी परिसरात पाऊसच न झाल्याने पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.तसेच पीकही पाण्याभावी जळू लागली आहे,त्यामुळे या भागात दुष्काळाची गंभीर परिस्थिती होत आहे. आंबेगावचा पूर्व भागात यंदाच्या वर्षी पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चारा वाटप करून शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.