पवारसाहेब, आता ओवाळण्या बंद झाल्या पाहिजेत : संजय राऊतशेतकरी आक्रोश मोर्चाच्या नाशिकमध्ये शनिवारी (३० डिसेंबर) पार पडलेल्या सांगता सभेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डाॅ. अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अशा प्रमुख नेत्यांची भाषणं पार पडली. यावेळी, संजय राऊतांचं भाषण चांगलंच गाजल्याचं पाहायला मिळालं.आपण सूड घेतलाच पाहिजे, आम्हाला ज्या तुरुंगात टाकलं, आमची वेळ आल्यावर तुमच्यासोबतही हेच केलं नाही तर बाळासाहेबांचं नाव सांगणार नाही, असा थेट इशाराच राऊतांनी विरोधकांना दिला.