कोकणात जाण्यासाठी चाकरमानी निघाले; अवजड वाहनांची मोठी संख्या, महामार्गावर ट्रॅफिक जॅम
सलग सुट्ट्या आणि गणपती उत्सवाच्या निमित्ताने अनेक चाकरमाने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. अवजड वाहनांना असलेली बंदी अनेक ठिकाणी तोडण्यात आल्याने महामार्गावरती अपघातांचे सत्र गणेशोत्सवाच्या तोंडावरच घडले आहे. यामुळे झालेले आठ ते नऊ अपघात या सगळ्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. दोन ते तीन तास इंदापूर माणगाव परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने अनेक प्रवाशांचे पुरते हाल झाले. मुंबईतून निघालेल्या वाहनांना कशेडी येथे येण्यासाठी जवळपास दुपारचे दोन वाजले.
Curated by Vishranti Shinde|TimesXP Maharashtra|17 Sept 2023