निर्णय घ्या, अन्यथा लढा उभारू; गाव सोडून मुंबईकडे निघालेल्या १५० दलित कुटुंबांसाठी डाॅ. भारत पाटणकर मैदानात
1326 views
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करामिरजच्या बेडग गावात महिन्याभरापूर्वी १६ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वागत कमान. बेकायदेशीर ठरवत ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आली. या कृतीमुळे गावातील दलित समाज पेटून उठला व तब्बल १५० कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्धार केला आपली मुलंबाळं, जनावरांसह संपूर्ण संसारासह आहे त्या स्थितीत या १५० कुटुंबांनी मंत्रालयाकडे कूच केली. दरम्यान, इतकी गंभीर बाब असून जिल्हाधिकाऱ्यांसह कुणीही या प्रकाराची दखल न घेतल्याने. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकरांनी संताप व्यक्त केला आहे. घराला कुलुपं लावून लोक न्यायासाठी चालत निघाले, तरी तुम्ही दुर्लक्ष करता? हे अत्यंत गंभीर. असल्याचं डॉ. भारत पाटणकर म्हणाले. तसेच, योग्य तो निर्णय न झाल्यास लवकरच महाराष्ट्रभर व्यापक लढा उभा करू, असा इशाराही दिला आहे.