पारधी लेकरांसाठी साताऱ्यात भरते आठवडी शाळा; १६० मुलांचं पालकत्व घेत आस प्रकल्पाचा स्तुत्य उपक्रम
1026 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१९९६ साली माणिक शेडगेंनी सुरु केलेली लोकसेवा परिवार ही संस्था गेल्या २५ हून अधिक वर्षांपासून पारधी लेकरांच्या भविष्यासाठी झटतेय...गावकुसाबाहेर, रानावनात पालावर आयुष्य काढणाऱ्या, गुन्हेगारीचा शिक्का लागलेल्या समाजातील लेकरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शेडगे अन् त्यांचे सहकारी काम करतायत...अन् याच माध्यमाधून आता आस प्रकल्पाने पारधी मुलांसाठी आठवडी शाळांचा उपक्रम सुरु केलाय...दर रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत साताऱ्यातील आठ पारधी वस्त्यांवर ही आठवडी शाळा भरवली जाते...या शाळांच्या माध्यमातून पारधी समाजातील मुलांचे शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि स्थैर्य या चार मुद्यांवर काम केलं जातं.अगदी कपड्यांपासून पुस्तकांपर्यंत सर्व काही पुरवत ही संस्था मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.२५ वर्षांपूर्वी जेव्हा शेडगेंनी या समाजासाठी कामाला सुरुवात केली तेव्हा इथली परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती...तेव्हा कुटुंब नियोजनापासून शिक्षणापर्यंतच महत्व संस्थेने या समाजात हळूहळू रुजवलं...१६० मुलांचं पालकत्व घेत आपल्या पत्नीसह शेडगेंनी मोठी कष्टानं या समाजात जागृती आणलीय...इथून शिकून गेलेले माजी विद्यार्थी आज आपल्या लेकरांच्या शिक्षणाबाबत सजग झालेल...सातारा व कोरेगाव तालुका हे या संस्थेचं कार्यक्षेत्र असून इतर तालुक्यात काम वाढविण्यासाठी सहकार्याची आवश्यकता असल्याचं माणिक शेडगे सांगतात...एका समाजाच्या उद्धारासाठी इतकी वर्षे अविरत अन् प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आणि एक आशादायी चित्र तयार करणाऱ्या माणिक शेडगे आणि अन् त्यांच्या लोकसेवा परिवाराच्या कष्टांचं कौतुक करावं तितकं थोडंय..